
कासेगांव : राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीत आज देशाचे महान उद्योगपती आणि समाजसेवक श्री. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. “End of an era!” या शब्दांत रतन टाटा यांच्या योगदानाला महाविद्यालयाने गौरवले आहे.
श्री. रतन टाटा हे एक दूरदर्शी उद्योगपती आणि परोपकारी होते, ज्यांनी भारताच्या कॉर्पोरेट क्षेत्रात एक अमूल्य ठसा उमटवला. त्यांच्या निधनाने केवळ उद्योगजगतच नव्हे तर संपूर्ण भारताला मोठा धक्का बसला आहे.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आपल्या शोकसंदेशात सांगितले, “रतन टाटा यांची विचारधारा, नीतिमत्ता, सहानुभूती आणि समाजसेवा यांचे आदर्श कायम प्रेरणादायी राहतील. त्यांच्या नेतृत्वामुळे उद्योग आणि समाजातील विविध क्षेत्रांना एक नवा मार्गदर्शन मिळाले.”
राजारामबापू कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्र येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आणि त्यांच्या स्मृतींना वंदन केले.